यंदा परतीच्या पावसाला विलंब होईल, (Weather Update) हवामान खात्याने वर्तवली शक्यता : राज्यभरात समाधानकारक हजेरी लावलेल्या पावसाचा परतीचा प्रवास यंदा लांबण्याची शक्यता आहे. जून आणि जुलैमध्ये राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पण यानंतर ऑगस्ट महिन्यात कमी पावसाची नोंद झाली.
उद्याचा हवामान अंदाज
मात्र, आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. त्यामुळे यंदा परतीच्या पावसाला विलंब होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 10 आणि 11 सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
हवामान अंदाज महाराष्ट्र
तर 12 सप्टेंबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नंदुरबार, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस वाढण्याची शक्यता असून, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हे पण वाचा:
- Punjab Dakh पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज, ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्रात सुरु राहणार वादळी पाऊस । उद्याचे हवामान
- १५,१६,१७ आणि १८ एप्रिल ला या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा व येलो अलर्ट | IMD LIVE Havaman Andaj Today
- Weather Update Maharashtra : आजपासून पुढील ४ दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज; विदर्भात ऑरेंज अलर्ट, तर मराठवाड्यात येलो अलर्ट
- Weather Update | शेतकऱ्यांच्या चिंता दूर! यंदाच्या हंगामात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा IMD चा अंदाज
- Weather Alert | विदर्भात आजपासून पुढील २ दिवस वादळी पावसासह गारपीटीचा अंदाज, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा